Dwarka Nagari AI Viral Video : भगवान श्रीकृष्ण यांची द्वारका नगरी समुद्रात कशी बुडाली होती? ४ हजार वर्षांपूर्वीचा काळ AI व्हिडीओद्वारे पाहा
भगवान श्रीकृष्ण यांच्या निधनानंतर त्यांची द्वारका ही समुद्रात बुडाली होती असं म्हटलं जातं. अर्थात काही इतिहास संशोधकांच्या मते द्वारका आजही समुद्रात आहे. कारण काही वर्षांपूर्वी समुद्रात एक शहर सापडल्याची माहिती समोर आली होती. अन् ते शहर म्हणजे आपल्या श्रीकृष्णाची द्वारकाच आहे, असा भारतीयांचा विश्वास आहे. असो, द्वारकेचं काय झालं? हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे.
पण विचार करा समुद्रात बुडण्यापूर्वी द्वारकेत काय बरं सुरू असेल? किंवा त्यावेळी लोकांची स्थिती कशी असेल? ती भलीमोठी लाट येताना पाहून लोकांनी स्वत:ला वाचवण्यासाठी काय केलं असेल? होय, याच प्रश्नांच्या कल्पनेतून एका AI व्हिडीओची निर्मिती करण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये द्वारकेमधील लोकांच्या शेवटच्या दिवशाची कल्पना करण्यात आली. तो दिवस पाहून खरंच तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.
हे जरूर वाचा:- 50 Finance - Investing Tips in Hindi for Beginners : पैसे बचाने और तेजी से बढ़ाने के 50 ट्रिक्स.हा व्हिडीओ होतोय व्हायरल
भारतातील ७ पवित्र तीर्थस्थळांपैकी एक म्हणून द्वारकेचा उल्लेख केला जातो. द्वारका नगरी हे श्रीकृष्णाचं राज्य होतं. पण श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका समुद्रात बुडाली, असं म्हटलं जातं. अर्थात या शहराचा शोध घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षात विविध प्रकारची संशोधनं करण्यात आली. पुरातत्वशास्त्रज्ञांनी पार समुद्राच्या तळाला जावून शोध घेतला. दरम्यान १९७९ साली शास्त्रज्ञांना खोल समुद्रात काही भांडी सापडली होती. तसंच शहराचे काही अवशेष सुद्धा सापडले होते. पण ते अवशेष द्वारका नगरीचेच आहेत असं ठामपणे सांगता येत नाहीत. इसवी सन पूर्व दुसऱ्या सहस्रामधली ती भांडी असावीत असं प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. पण द्वारकेचा शोध अद्याप थांबलेला नाही. पुरातत्वशास्त्रज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे द्वारकेचा शोध घेत आहेत.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.